भारत सरकारने ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या राज्यामध्ये आयुषमान भारत उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम औरंगाबाद, बीड, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळांमध्ये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी निकषाप्रमाणे प्रत्येक शाळेतील प्रशिक्षणार्थीं मुख्याध्यापक व दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्री) यांनी या लिंकद्वारे दिनांक १५ डिसेंबर २०२० रात्री १२ वाजेपर्यंत नावे नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केलेल्या मुख्याध्यापक व दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्री) प्रशिक्षणार्थीचे माहे डिसेंबर २०२० मध्ये ONLINE प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे सदर लिंकमधील माहिती वेळेत व अचूक भरावी.